Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नैसर्गिक आपत्ती आणि अनियमित वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट

जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसापूर्वी वादळी वारा सह तुरक पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झालं त्याबरोबर नियमित वातावरणात

रोहित्र बंद विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; घेराव नंतर वीज कनेक्शन सुरू
शेतकर्‍यांनी केली पेरणीची सुरूवात
डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसापूर्वी वादळी वारा सह तुरक पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झालं त्याबरोबर नियमित वातावरणात बदल आणि अनियमित वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे लागलेला खर्च तो देखील निघत नसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे सध्या उन्हाच्या पारा  दिवसेंदिवस वाढत असल्याने रसाळ फळांची मागणी आता नागरिकांकडून वाढू लागली आहे या रसाळ फळांची लागवड करणारे शेतकरी यांना मात्र भाव मिळत नाही चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या शेतात खरबुजाची लागवड केली होती परंतु अनियमित वीज पुरवठा आणि वातावरण बदलामुळे खरबुजाचे उत्पन्नात घट निर्माण झालेली आहे शेतात पाणीपुरवठा करता येत नाही यामुळे त्याचा परिणाम खरबुजांवर होऊन खरबुजांची वाढ होत नाहीये तसेच खरबूज खराब होत आहे आणि अशा परिस्थितीत व्यापारी कमी भाव मागत असल्याने लागलेला खर्च लाखोच्या घरात आहे परंतु उत्पन्न त्यापेक्षाही कमी येत असल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. 

COMMENTS