अमृतसर : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक ज

अमृतसर : पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जंगा वळणाजवळ पिकअप ट्रक आणि ट्रेलर (मोठा ट्रक) यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील सुमारे ३० जण अस्थी विसर्जनासाठी पिकअप ट्रकमधून जात असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS