Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारची कर्जमाफी तकलादू : राजू शेट्टी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे

भ्रष्ट अधिकार्‍यांवर बडगा उगारात सार्वजनिक बांधकाम विभागात आणावी शिस्त
ढिगार्‍याखालील जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य
स्व. अजितदादांनीच नीलेश लंकेंना संधी दिली
देवेंद्र फडणवीस सरकारची तकलादू कर्जमाफी; शेतकऱ्यांचा विश्वासघात, राजू  शेट्टी यांचा आरोप - Marathi News | Raju Shetti Slams Maharashtra Budget  Says Two Lakh Farm Loan Waiver By ...

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे संबोधत राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप केला. ऑक्टोबर महिन्यात शेतकरी आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र आता केवळ दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS