Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिहे-कठापूरसाठी 697 कोटी मिळणार; जलपूजनासाठी पंतप्रधान खटावला येणार

जिहे-कठापूर योजनेसह फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधीसाठी खा. रणजितसिंह, आ. जयकुमार गोरेंसह आ. सदाभाऊ खोत पंतप्रधानांच्या भेटीलाऔंध / वार्ताहर

जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावा : पालकमंत्री
महिलांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न : ना. अ‍ॅड. यशोमती ठाकूर
उच्च शिक्षणासाठी शिवराज विश्‍वनाथ डांगे इंग्लंडला रवाना

जिहे-कठापूर योजनेसह फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधीसाठी खा. रणजितसिंह, आ. जयकुमार गोरेंसह आ. सदाभाऊ खोत पंतप्रधानांच्या भेटीला
औंध / वार्ताहर : माण-खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्‍या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करुन योजनेच्या उर्वरित कामासाठी 697 कोटींचा निधी मिळण्यासाठी तसेच फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरु करावे. या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मोदींनी या योजनेचा समावेश पीएमकेएसवायमध्ये करुन लागणारे 697 कोटी त्वरित देण्याचे आदेश केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला दिले. फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांनी यापूर्वीही जलशक्ती मंत्रालयासह विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन जिहे-कठापूर योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती. या योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत होण्यासाठी या दोघांनी प्रयत्न केले होते. दोन दिवसापूर्वी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे आणि आ. सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली.
3.17 टीएमसी पाणी उचलून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील 67 गावांमधील 27 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या जिहे-कटापूर योजनेसाठी आत्तापर्यंत 632 कोटींचा निधी खर्च करण्यात आला. बॅरेज आणि रायझिंग मेन्न्सची कामे झाली आहेत. सन 2021 मध्ये योजनेचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी चाचणी घेण्यात आली. उरलेले 19600 हेक्टर क्षेत्र आगामी तीन वर्षात ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित निधी मिळत नाही, असे सांगून प्रकल्पाचे संपूर्ण काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेतून लागणारा सर्व निधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा समावेश पीएमकेएसवायमध्ये त्वरित करावा, अशी मागणी खा. निंबाळकर आणि आ. गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
जगप्रसिध्द तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि फलटणला जोडणार्‍या रेल्वे लाईनचा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला आहे. या कामासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम झालेले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजप सरकारने या कामासाठी 1400 कोटींच्या निधीला स्विकृती दिली होती. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने प्रत्येकी 50 टक्के निधी खर्च करुन हे काम पूर्णत्वाला जाणार होते. या योजनेचा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे गेला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून या कामासाठी सहकार्य करण्याविषयी सांगितले होते. मात्र, खा. शरद पवार यांच्या दबावामुळे सध्याच्या महाराष्ट्र सरकारने काहीच कार्यवाही केली नसल्याचे खा. निंबाळकर यांनी मोदींच्या निदर्शनास आणून दिले. फलटण-पंढरपूर रेल्वे लाईनच्या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
केंद्र सरकार शेतकर्‍यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शेती हा एक यशस्वी उद्योग म्हणून कसा भरभराटीला येईल. यावर सरकार निरंतर काम करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी खासदार-आमदारांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

COMMENTS