Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री सत्तारांविरोधात 5 फौजदारी तक्रारी दाखल

सिल्लोड ः मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात एकाच दिवशी पाच फौजदारी तक्रार दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच तक्रारदारांनी मागणी

जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री सत्तार गोत्यात
ईडी, सीबीआयच्या कचाट्यात येण्यास वेळ लागणार नाही !
अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे

सिल्लोड ः मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात एकाच दिवशी पाच फौजदारी तक्रार दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच तक्रारदारांनी मागणी केली आहे की, पोलिस प्रशासनाने अगोदर प्राथमिक चौकशी करावी. तसेच आम्ही दिलेले सर्व पुरावे व प्राप्त पुरावा आधारे दोष सिद्धी अंती गुन्हा दाखल करावा. त्यामुळे आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास सत्तार यांची अडचण वाढू शकते. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यासह आणखी 25 जणांचा संशयित आरोपी म्हणून तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

COMMENTS