पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली

Homeताज्या बातम्या

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली

विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली

अहमदनगर प्रतिनिधी  - अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेले आहे. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण

एमएसपीमधील वाढ तुटपुंजी ः डॉ. अजित नवले
लोणी व्यंकनाथमध्ये सेवानिवृत्त भूमिपुत्रांचा गौरव; रवींद्र चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश

अहमदनगर प्रतिनिधी  – अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेले आहे. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण, सरकारने साफ नकार दिला आहे. अशातच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी 400 रुपये मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहे. महसूल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी केली जात आहे.  . महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागितले पैसे आहे. या बद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

COMMENTS