महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज – चंद्रभान अग्रवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज – चंद्रभान अग्रवाल

नगर –  गावात नवीन येणाऱ्या परिवारास “एक रुपया एक वीट ” देण्याची प्रथा महाराजा अग्रसेन यांनी सुरु केली. मदतीत सर्वांचा सहभाग असावा हा हेतू होताच त्

सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग
सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून होणार -आ. निलेश लंके
पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच

नगर – 

गावात नवीन येणाऱ्या परिवारास “एक रुपया एक वीट ” देण्याची प्रथा महाराजा अग्रसेन यांनी सुरु केली. मदतीत सर्वांचा सहभाग असावा हा हेतू होताच त्याच बरोबर ज्याची  जशी क्षमता  तसे त्याने सोन्याचा, चांदीचा ,अथवा तांब्याचा  रुपया द्यावा हा महत्वाचा संदेश होता.ज्याद्वारे सर्वांची मदत एकसमान दिसेल असा हा अभिनव उपक्रम  राबविणाऱ्या महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची  आजच्या काळात नितांत गरज  असल्याचे मत उद्योजक चंद्रभान अग्रवाल यांनी व्यक्त केले.

अहमदनगर जिल्हा अग्रवाल समाजाच्या वतीने महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीदिनी महात्मा फुले  वसतिगृह माळीवाडा संस्थेस जीवनावश्यक वस्तू ,कपडे व साहित्य तसेच सावलीच्या माध्यमातून गरजू परिवारांना किराणा कीटचे मोफत वाटप  नगर वाचनालय येथे नगरचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री.चंद्रभान अग्रवाल, संपदा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी लखमीचंद गोयल ,श्री.महेश बन्सल,श्रीमती लीला अग्रवाल,श्रीमती शोभा अग्रवाल, श्रीमती इंदूमती अग्रवाल  यांच्या  उपस्थित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व  समाज बंधुभगिनीच्या हस्ते  माता लक्ष्मी व अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.

संपदा ट्रस्टचे श्री.लखमीचंद गोयल यांनी त्यांच्या गावी कोटा,राजस्थान येथे अग्रसेन जयंती दिनी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली.नगरमध्येही जयंतीदिनी भव्य शोभायात्रा काढण्यात यावी तसेच विविध स्पर्धा घेण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.  

नवरात्र पूर्वी प्रत्येक घरी साफसफाई करताना अनेक वस्तू, कपडे आपण काढतो, मात्र कधीतरी उपयोगी येतील म्हणून पुन्हा ठेवतो व हा पसारा वाढतच जातो.या सर्व वस्तू गरजूंना देण्याचा उपक्रम गतवर्षी राबविण्यात आला.त्यास समाज बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मुलांना न बसणारे सुस्थितीतील कपडे, साड्या, चादरी, विद्युत उपकरणे जमा करू अग्रसेन जयंती दिनी गरजूंना सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पोहचविण्यात आली. यंदाही या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला .तसेच यावर्षी गरजू परिवारांना  किराणा  कीट पोहच करण्यात आल्या. या पुढे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात  येणार असून या सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा  अग्रवाल समाजातर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS