भाजपविरोधात एकत्र येण्याचे ममतांचे साकडे ; पवार, ठाकरे, सोनियांना लिहिले पत्र; निवडणुकीनंतर निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपविरोधात एकत्र येण्याचे ममतांचे साकडे ; पवार, ठाकरे, सोनियांना लिहिले पत्र; निवडणुकीनंतर निर्णय

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी
भारत आणि ऑस्ट्रेलिया सहयोगी प्रकल्पांसाठी एकत्रितपणे काम करणार
रेल्वेखाली उडी घेत माय-लेकीची आत्महत्या I LOKNews24

कोलकाता: पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. ममता यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्र लिहून हे आवाहन केले आहे.

 ममता यांनी सोनिया गांधी, शरद पवार, डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन, समाजवादी  पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जनगमोहन रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे. या वेळी ममता यांनी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया (दुरुस्ती) विधेयकाचाही उल्लेख केला आहे. हे विधेयक संघ व्यवस्थेच्या विरोधात असल्याचे ममता यांनी पत्रात म्हटले आहे. भाजप हे केवळ दिल्लीच्याबाबत करत नाही, तर संपूर्ण देशात हाच प्रकार सुरू आहे. गैर भाजपाशासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून समस्या निर्माण केल्या जात आहेत, असे सांगतानाच नियोजन आयोगाचे नाव नीती आयोग ठेवल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

निवडणुकीनंतर ठोस योजना

भाजप सरकारने सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा विरोधी पक्षांच्या विरोधात वापर सुरू केला आहे. मोदी सरकारच्या आदेशामुळेच ईडीने केवळ तृणमूल काँग्रेस नव्हे, तर डीएमकेसहीत अन्य पक्षांच्या नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे, असे सांगतानाच आता लोकशाही आणि संविधानावरील भाजपचे आक्रमण परतवून लावण्यासाटी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. सर्व समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र यावे. विधानसभा निडवणुकीनंतर याबाबत एक ठोस योजना बनविण्याची गरज आहे, असेही ममता दीदींनी म्हटले आहे.

COMMENTS