दिवाळीच्या तोंडावर निर्बंध शिथिल !;राज्यातील उपाहारगृहे, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळा वाढणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीच्या तोंडावर निर्बंध शिथिल !;राज्यातील उपाहारगृहे, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळा वाढणार

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आणखी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्यात 2

पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी | LOKNews24
खारे कर्जुने येथील जुनी विहिर खचली
समृद्धीवरील अपघातात पिता-पुत्र गंभीर जखमी

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आणखी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्यात 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांना सुरूवात होत असून, यासोबतच उपाहारगृहे, दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंबंधीच्या मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.
अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तसेच याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणार्‍या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

COMMENTS