कोरोना काळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : ना. देसाई

Homeमहाराष्ट्रसातारा

कोरोना काळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : ना. देसाई

कोरोना काळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली, असा विश्‍वास राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचे विक्रम गोखलेंकडून समर्थन
22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार | LOK News 24
गुणरत्न सदावर्तेंना सरकारची सुरक्षा का ?

पाटण / प्रतिनिधी : कोरोना काळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली, असा विश्‍वास राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत नवारस्ता, ता. पाटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.     

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. देसाई म्हणाले, शासनामार्फत शेतकर्‍यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे यावे. कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना योजना समजावून सांगाव्यात आणि त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावे.

यावेळी गुरुदत्त काळे यांनी कृषी संजीवनी मोहिमेची माहिती दिली. दौलत चव्हाण यांनी कृषी विभागाच्या विविध योजना बाबत मार्गदर्शन केले. डॉ. खांडेकर यांनी खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. सुनिल ताकटे यांनी ऊस उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी ना. देसाई यांच्या शुभहस्ते तालुक्यातील प्रगतशील शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विभागामार्फत बियाणे व यूरिया ब्रिकेट्सचे वाटप करण्यात आले. मेळाव्याप्रसंगी माजी जि. प. सदस्य जालिंदर पाटील, सरपंच विष्णू पवार यांच्यासह पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्र कालवडेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भरत खांडेकर, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, मंडळ कृषी अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.


कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व परिसरातील शेतकर्‍यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

COMMENTS