Homeशहरंमुंबई - ठाणे

आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली… भातखळकरांचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी “लखीमपूर घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली. 

दहशतवादी संघटनांशी संबंध; मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक
बिहारमध्ये चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू; नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरातील घटना
‘नो किंग्स’ म्हणत ट्रम्प विरोधात कोट्यवधी नागरिक रस्त्यावर !

मुंबई : प्रतिनिधी

“लखीमपूर घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली. 

मात्र, जर कुणी पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून मुंबईकरांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा प्राणपणाने ‘महाराष्ट्र बंद’ला रस्त्यावर उतरून विरोध करेल.” असा इशारा अतुल भातखळकर यांनी सरकारला दिला आहे.

लखीमपूरखेरी प्रकरणानंतर भाजपाच्या विरोधात देश आणि राज्यातील विरोधक एकवटले आहेत. शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. 

यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केला आहे. 

हे लोक लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा करत आहेत, असा आरोप भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला.

COMMENTS