Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढणार ः संजय राऊत

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यात येत असून, नव्या चेहर्‍यांना लोकसभेसाठी संधी

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिला पुन्हा जेलवारी घडवण्याचा इशारा
संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना निघाला भला मोठा साप

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यात येत असून, नव्या चेहर्‍यांना लोकसभेसाठी संधी देण्यासाठी पक्षाकडून नियेाजन सुरू आहे. त्यातच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय राऊत निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलतांना खासदार संजय राऊत म्हणाले की, पक्षाने आदेश दिल्यास निवडणूकच काय आम्ही तुरुंगातही जातो, असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे संजय राऊत हे ईशान्य मुंबईतून भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या विरोधात लढणार असल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकारांशी बोलतांना राऊत म्हणाले की, पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो. आदेश आल्यावर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश जो असेल ते मानणार्‍यांपैकी आम्ही आहोत. ईशान्य मुंबईत राऊत सोडून द्या साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी सव्वा दोन लाख मतांनी विजयी होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. ईशान्य मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या मदतीने सातत्याने भाजपचा उमेदवार ईशान्य मुंबईत निवडून आला आहे. त्यामुळे इथे आमच्यातील साधा कार्यकर्ता, पदाधिकारी आणि कोणीही उभा केला तरी ईशान्य मुंबईत शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असा दावा राऊत यांनी केला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. साहेबांच्या नावावर तुम्ही निवडून आला ना? हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्‍न आहे. मी बोलणार नाही. शरद पवार प्रमुख नेते आहेत. त्यांच्या सहकार्‍यांना जे पदे मिळाली ते शरद पवार या नावामुळेच. त्यांच्या प्रतिष्ठेमुळेच. नाही तर आर आर पाटलांसारखा साधा कार्यकर्ता या राज्याचा उपमुख्यमंत्री झाला नसता. छगन भुजबळ तुरुंगातून आल्या आल्या मंत्री झाले नसते. हे सर्व शरद पवारच करू शकतात, असे राऊत म्हणाले. सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल असतील या सर्वांना पवारांनीच घडवले. जसे बाळासाहेब नसते तर आम्ही कोण असतो? शेवटी जो प्रमुख नेता तोच घडवतो सर्व. तो किती लहान, त्याचा पक्ष किती लहान हे नंतरच्या गोष्टी आहेत. आज आम्ही जे आहोत ते बाळासाहेबांमुळेच आहोत. आज राष्ट्रवादीचे नेते इकडे तिकडे खुर्च्यांवर बसले आहेत ते केवळ शरद पवार यांच्यामुळेच आहे. आजचा भाजप हा मोदींमुळे आहे. हे सत्य आहे. ते स्वीकारले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील मृत्यू प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा प्रश्‍न दादाचा नसून महाराष्ट्राचा आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. अनेक वर्ष मंत्री आहात. त्या आधी अनेक वर्ष ठाणे महापालिका सांभाळली आहे. ठाण्यात एका रात्रीत 24 लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे अजितदादा कशाला? हा जनतेचा प्रश्‍न आहे. तुमचे ठाणे आहे ना? ठाण्यावर तुम्ही मालकी सांगताना ना? मग कारणे सांगा. तुम्ही महाराष्ट्र घडवायला निघाला पण ठाण्यातील मृत्यू रोखू शकला नाही, असेही ते म्हणाले.

COMMENTS