Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होतील ?

भाजपा नेते आशिष देशमुख यांचा मोठा दावा

मुंबई प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षबदलाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं असून महा

नंदिनी गुप्ता ठरली मिस इंडिया
क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघात गंभीर जखमी
अमेरिकन न्यायालयातील असामाजिकता ! 

मुंबई प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षबदलाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं असून महाविकास आघाडीतील अनेक नेतेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. येत्या काळात राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपा किंवा भाजपा संलग्न पक्षात सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

“मागच्या दहा वर्षांत जे जे कोणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपा किंवा भाजपा संलग्नित होऊन राजकारण करण्याचं ठरवलं आहे. येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपामध्ये आणि महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही”, असा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये हजेरी लावणारा एक मोठा नेता लवकरच भाजपात सामील होणार, असा दावा आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अशोक चव्हाण भाजपावासी झाले. आशिष देशमुखांचा दावा खरा ठरल्याने आता विरोधी पक्षनेत्याबाबत त्यांनी केलेलं विधानही खरं ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आ

COMMENTS