Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

संग्रहीत सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. टंचाई

इस्लामपूर येथे एका व्यासपीठावर 35 जुळी; मुक्तांगण प्ले स्कूलचा अनोखा उपक्रम
खा. शरद पवार साहेब यांच्या घरावरील हल्ल्याचा पाटणमध्ये निषेध
राजारामबापू सहकारी बँकेस 36.48 कोटींचा नफा : शामराव पाटील

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. टंचाईच्या झळा वाढल्याने जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सहा गावे व पाच वाड्यांवर सात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. 6 हजार 908 लोकसंख्येला आणि 1 हजार 869 पशुधनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
यंदा उन्हाचा चटका वाढत आहे. तुलनेने यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी राहिली आहे. मात्र, आता टंचाईची दाहकता वाढत चालल्याचे चित्र आहे. आगामी दोन आठवड्यात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुमारे 50 गावांत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बहुतांश विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य सध्या पाहायला मिळत आहे.
दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांसह कराड, वाई व सातारा तालुक्यांतील दुर्गम डोंगराळ भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यात सहा गावे व पाच वाड्यांवर पाणी टंचाई जाणवत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात टँकरव्दारे गावे व वाड्यांना पाणी पुरवठा सुरु केला आहे. सध्या सात टँकर सुरू असून यामध्ये वाई- दोन, सातारा- दोन, कराड- दोन, माण- एक याप्रमाणे टँकर सुरू आहेत. टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी खटावमधील दोन विहिरी व तीन बोअरवेल, वाईत दोन विहिरी, सातार्‍यात एक विहिर, कराड तालुक्यात एक विहिर आणि फलटण तालुक्यात दोन बोअरवेल प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत.

COMMENTS