Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमा प्रश्‍नांवरुन लोकसभेत गदारोळ

विरोधक खासदारांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली प्रतिनिधी - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. लोकसभेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक झाल्याचे पह

उत्तराखंडात निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर 40 मजूर अडकले, बचावकार्य सुरू
परिश्रम, संस्कार व सकारात्मकता आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली – डॉ.भारतभूषण क्षीरसागर
अपयशाने वैफल्यग्रस्त न होता आनंदाने जगा ः रामदास फुटाणे

नवी दिल्ली प्रतिनिधी – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. लोकसभेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरत, सीमाप्रश्‍नावरुन लोकसभेत सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जाणूनबुजून पेटवला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात काहीही वायफळ बोलत आहेत. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. तरीही या हल्ल्यामागे असलेल्या एकावरही अद्याप कर्नाटक सरकारने कारवाई केलेली नाही.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावादाच्या प्रश्‍नांवर भाष्य करावे अशी मागणी देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. त्यांच्या या मागणीनंतर कर्नाटकचे खासदार आक्रमक झाले. त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदारांनी देखील आक्रमक होत, कर्नाटक सरकारविरोधात जोेरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही दादागिरीची आहे. महाराष्ट्र ते सहन करणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटक सरकारने उगीचच वाद उकरून काढला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार केला जात आहे. महाराष्ट्रातून जाणार्‍या वाहनांची तोडफोड केली जात आहे. आम्ही याचा धिक्कार करतो. कर्नाटक व महाराष्ट्राच्या खासदारांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली तेव्हा राज्यसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दोन्ही राज्याच्या खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी ओम बिर्ला म्हणाले, दोन्ही राज्यांसाठी हा मुद्दा अतिशय संवेदनशिल आहे. त्यावर सविस्तर चर्चा करावी लागेल. आताच चर्चा करता येणार नाही. तसेच, हा वाद दोन राज्यांमधील आहे. आणि ही संसद आहे. या वादात केंद्र सरकार काय करू शकेल. त्यानंतर काही वेळाने दोन्ही राज्यांच्या खासदारांनी घोषणा देणे बंद केले.

महाराष्ट्र राज्याविरोधात षडयंत्र – सुप्रिया सुळे
लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहे, हे चालणार नाही, असे देखील त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे दोन्ही राज्यात भाजपचे सरकार असतांना देखील, जाणूनबुजून महाराष्ट्राविरोधात आकंड-तांडव करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. सुप्रिया सुळेंनी आक्रमकपणे महाराष्ट्राचा मुद्दा मांडताच सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. कर्नाटकच्या खासदारांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदारही आक्रमक झाले. त्यांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

COMMENTS