Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोट उलटल्याने दोन जण बेपत्ता

मुंबई : समु्द्रात सध्या पाणी जास्त असून, पावसाचा जोरही चांगलाच असून, हवामान विभागाने खबरदारीचा इशारा दिला आहे. समुद्रात जाताना खबरदारीचा इशारा दे

कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल
दिग्गज मल्ल घडविणार्‍या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका !
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान

मुंबई : समु्द्रात सध्या पाणी जास्त असून, पावसाचा जोरही चांगलाच असून, हवामान विभागाने खबरदारीचा इशारा दिला आहे. समुद्रात जाताना खबरदारीचा इशारा देण्यात आलाय. काही मासेमार मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. तीन जण एका बोटीने रविवारी रात्री नऊ वाजता मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. समृद्रात गेल्यानंतर त्यांची बोट उलटली. तिघांपैकी एका जणाने समुद्र पोहून स्वतःला बाहेर काढले. उरलेल्या दोन जणांच्या बाबतीत अद्याप पत्ता लागला नाही. या दोन जणांचा शोध आज सकाळपासून घेण्यात आला. पण, अद्याप ते बेपत्ता आहेत. उशेणी भंडारी आणि विनोद गोयल अशी बेपत्ता झालेल्या मच्छिमारांची नावे आहेत.

COMMENTS