Homeताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळे 53 गावातील 1300 हेक्टरवर एकवीशे शेतकऱ्यांचे नुकसान

जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात 7 मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह तुरक पावसाने तालुक्यातील 53 गावांमधील शेतातील पिकांचे

उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल; बांधकाम क्षेत्रासाठी दिलासा : महसूलमंत्री बावनकुळे यांनी क्रेडाईचे प्रश्‍न लावले मार्गी
स्वयंपूर्ण गावासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- कृषिमंत्री दादाजी भुसे
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात 7 मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह तुरक पावसाने तालुक्यातील 53 गावांमधील शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यानुसार नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी सांगितले की, चोपडा तालुक्यात 7 मार्च रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह तुरक पावसामुळे 53 गावातील 1300 हेक्टर वरती 2100 शेतकऱ्यांचं शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीमध्ये हरभरा, मका, रब्बी, ज्वारी, गहू आणि केळी बाजरीचे क्षेत्र असल्याचे यावेळी सांगितले. मंत्रालय स्तरावरुन आदेश प्राप्त झाल्याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीद्वारे नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. 

COMMENTS