Homeताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळे 53 गावातील 1300 हेक्टरवर एकवीशे शेतकऱ्यांचे नुकसान

जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात 7 मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह तुरक पावसाने तालुक्यातील 53 गावांमधील शेतातील पिकांचे

’प्रतापगड’ची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी : संस्थापक पॅनलचे आवाहन
बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन पद्धतीला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात 7 मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह तुरक पावसाने तालुक्यातील 53 गावांमधील शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यानुसार नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी सांगितले की, चोपडा तालुक्यात 7 मार्च रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह तुरक पावसामुळे 53 गावातील 1300 हेक्टर वरती 2100 शेतकऱ्यांचं शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीमध्ये हरभरा, मका, रब्बी, ज्वारी, गहू आणि केळी बाजरीचे क्षेत्र असल्याचे यावेळी सांगितले. मंत्रालय स्तरावरुन आदेश प्राप्त झाल्याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीद्वारे नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. 

COMMENTS