Homeताज्या बातम्या

कालांश उद्योगच्या वतीने कोपरगावमध्ये वृक्षारोपण  

कोपरगाव शहर : तालुक्यातील धारणगाव येथील कालांश राजगिरा लाडू चिक्की महिला बचत गटाकडून ग्रामीण भागात वटपौर्णिमेनिमित्त  ५० पेक्षाअधिक वनऔषधी क

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
संगमनेरमध्ये उद्या पुस्तक जत्रा 

कोपरगाव शहर : तालुक्यातील धारणगाव येथील कालांश राजगिरा लाडू चिक्की महिला बचत गटाकडून ग्रामीण भागात वटपौर्णिमेनिमित्त  ५० पेक्षाअधिक वनऔषधी कडू लिंब, बदाम, फुलांची झाडे तसेच वड या झाडाची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आपले या देशासाठी छोटेसे योगदान या उद्देशाने आपल्या गावासाठी झाडांची वृक्षांची लागवड करत अनोख्या पध्दतीने वटपौर्णिमा साजरी केली.या प्रसंगी कालांश उद्योगचे सर्वेसर्वा रोहित काले, विनय काले, कालांश कंपनीतील अधिकारी कर्मचारी, उमेश मोरे, राजू रणशूर, सागर रणशूर, योगेश मोरे, ललित केदारी, तुषार चंदनशिव, सुरज केकान, राजू वाघ, सार्थक चंदनशिव, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS