Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ः राज ठाकरे

मनसेसैनिक आक्रमक झाल्यानंतर विनाटोल सोडल्या गाड्या

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील टोलदरवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल
दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा ः राज ठाकरे
निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील टोलदरवाढीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल करतांना, टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांच्या टोलदर कमी करण्याबाबतच्या वक्तव्यांचे व्हिडिओच दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टोलबंदी असल्याचे वक्तव्य केले होते. हाच व्हिडिओ दाखवत त्यांनी फडणवीस धादांत खोटे बोलत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच टोलनाक्यावर यापुढे गाड्या अडवल्या तर टोल जाळून टाकू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
यावेळी राज ठाकरेंनी टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्याच कंपन्यांना टोलचे कंत्राट कसे मिळते ? असे सवाल उपस्थित करत नेते आपल्याला लुबाडतात, हे जनतेला कळत नाही का? टोल हा मोठा घोटाळा आहे, राज्यातील या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे.. अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी उपोषण पुकारले होते. मनसे अध्यक्षांनी भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेतले. राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिकही मैदानात उतरले आहेत. आमची माणसे टोलनाक्यावर उभी राहतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी दिल्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुलुंड टोलनाक्यावर जाऊन आंदोलन केले. तसेच देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून लहान वाहने विनाटोल पुढे सोडली. नवी मुंबईत देखील मनसैनिक टोल नाक्यावर उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ असल्याचे सांगत आहे. त्यानूसार आम्ही लोकांना जागृत करत आहोत, की टोलमाफी आहे, असे अविनाश जाधव म्हणाले आहेत.

COMMENTS