Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात यंदाचा उन्हाळा कडक

उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाकडून इशारा

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात एप्रिल महिना उजाडल्यानंतर उष्णतेच्या झळा मोठया प्रमाणावर वाढत असून, अनेक शहरातील तापमान 38 अंशांच्या वर गेले आहे. त्यातच

तिरुपतीला पाच किलो सोन्याची तलवार अर्पण DAINIK LOKMNTHAN
आमची लढाई ही देशातल्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे – अतुल लोंढे 
साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात एप्रिल महिना उजाडल्यानंतर उष्णतेच्या झळा मोठया प्रमाणावर वाढत असून, अनेक शहरातील तापमान 38 अंशांच्या वर गेले आहे. त्यातच यंदा एप्रिल ते जूनदरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात उन्हाच्या कडक झळा सोसाव्या लागतील, तसा इशाराच हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
यंदाच्या उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह, पश्‍चिम विदर्भात एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरी इतके राहणार आहे. तर, पूर्व विदर्भ, कोकणात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात म्हणजेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर, देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पारा सध्या 38 अंशांपर्यंत गेला आहे. आजपासून राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. आज राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता अधिक आहे. एप्रिल महिन्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगालचा दक्षिणेकडील भाग, उत्तर छत्तीसगड, गुजरात, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पंजाब हरियाना राज्यात तीव्र उष्ण लाटेची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. आता केवळ ओडिशापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एप्रिल महिन्यापासून उष्णतेची लाट – हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये एप्रिलमध्ये सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची उष्णतेची लाट सुरू होणार आहे. खुल्या मैदानासारख्या भागात कमाल तापमान हे कमीत कमी 40 डिग्री सेल्सियस, किनारपट्टीत भागात 37 डिग्री सेल्सियस असते. तर डोंगराळ भागात तापमान हे 30 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचतं. यंदाचा उष्णतेची लाट अधिक दिवस राहण्याची शक्यता आहे.

COMMENTS