Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदिच्छाच्या मृतदेहाची शोध मोहीम पोलिसांनी थांबवली

मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा

मुंबई/प्रतिनिधी : वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली आरोपी मितू सिंहने दिली आहे. हत्या करुन सदिच्छाचा मृ

हॉटेल मालकाची तलवारीने सपासप वार करून हत्या: परिसरात प्रचंड तणाव। LokNews24
आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
शहरात चित्रकला प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई/प्रतिनिधी : वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची कबुली आरोपी मितू सिंहने दिली आहे. हत्या करुन सदिच्छाचा मृतदेह वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याचेही आरोपीने कबूल केले आहे. दरम्यान याप्रकरणी वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात सदिच्छा सानेचा मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांनी सुरु केले होते. मात्र तिचा मृतदेह हाती न लागल्याने शुक्रवारी नौदलाकडून शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मितू सिंह सातत्याने मागचा दीड वर्षात आपला जबाब बदलत होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आणि त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच खून केल्याची कबुली तर दिलीच शिवाय ज्या ठिकाणी सदिच्छाचा मृतदेह टाकला होता ती जागा देखील पोलिसांना दाखवली. सकाळपासूनच पोलिसांनी नौदलाच्या माध्यमातून सदर ठिकाणी शोधमोहीम सुरु केली. मात्र दुपारपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही यानंतर ही मोहीम थांबवण्यात आली आणि पुन्हा एकदा नव्याने दुसर्‍या यंत्रणांच्या माध्यमातून शोध मोहीम करणार असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे, असा आरोप सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी केला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिस बनाव करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मागील 14 महिन्यांपासून आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याच सांगत होतो. मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही? जर मितू सिंह यांनी माझ्या मुलीची हत्या करुन समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही? तसेच तिच्याजवळ असलेले साहित्य अजून पोलिसांना का मिळाले नाही? असे सवाल उपस्थित करत या प्रकरणात योग्य तपासणी करुन कारवाई केली जावी अशी मागणी सदिच्छाचे वडील मनीष साने यांनी केली आहे. दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसर्‍या वर्षात शिकत होती. 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली. ती माघारी परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सदिच्छा बेपत्ता होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही जेव्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियासह बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते. तर पालघरमध्येही या प्रकरणी अनेक मोर्चे निघाले होते.

COMMENTS