Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची पालकमंत्र्यांकडून पहाणी

वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप

बीड प्रतिनिधी - राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी,बोरीपिंपळगा

पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत-जास्त झाडे लावावीत : ना. रामराजे नाईक-निंबाळकर
वडवणीचा ऐतिहासिक एल्गार; शेतकर्‍यांनीच ठरवला दुधाचा भाव, 19 जूनपासून 80 रुपये लिटरतुकाराम मुंडे यांच्या भेसळविरोधी कारवाईनंतर दूध उत्पादक एकवटले; सरकारकडे भाव मागणार नाही, आता आपणच भाव ठरवणार असा निर्धार
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा

बीड प्रतिनिधी – राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी,बोरीपिंपळगाव या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या  शेतपिकांची प्रत्यक्ष पहाणी करुन शेतकर्‍यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीची पंचनामे युद्धपातळीवर करुन अहवाल शासनास सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच बीड तालुक्यातील तिप्पटवाडी तसेच घोसापुरी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. तिप्पटवाडी येथील शेतकरी अनंत नामदेव शेंडगे यांचे व घोसापुरी येथील शेतकरी श्रीहरी कुटे यांचे प्रत्येकी दोन बैल वीज पडून दगावले होते.  या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेत मदतीचे धनादेश या पशुपालकांना पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

COMMENTS