Homeताज्या बातम्या

धान उत्पादन शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाच स्वागत आहे – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी - पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पातून क

वीज बिलांचा गोंधळ थांबवा; ग्राहकांना मनस्ताप देणाऱ्या चुकीच्या आकारणीविरोधात नांदेडमध्ये संताप
टॉप हंड्रेड थकबाकीदारांमध्ये…नगर टॉपवर
न्यू आर्ट्स महाविद्यालयात शैक्षणिक धोरणाविषयी कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर प्रतिनिधी – पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 6 हजार रुपयांचे अनुदान दिलं जाईल. मात्र, या निर्णयावरून राज्यामध्ये शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पामध्ये खोली कमी आणि उथळपणा जास्त असेच वर्णन या अर्थसंकल्पाचे करावे लागेल, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. धान उत्पादन शेतकऱ्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS