Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेक्षकांना ’अप्सरा’तून मिळणार सुरेल संगीताची मेजवाणी

अप्सरा’ चित्रपट 10 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार

देवळाली प्रवरा ः प्रेम, राजकारण, अँक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी ’अप्सरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना  मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडिय

अबब…नगरच्या पोलिसांनी केला एक टन गांजा नष्ट…
भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कोपरगाव अध्यक्ष पदी गायकवाड
शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच

देवळाली प्रवरा ः प्रेम, राजकारण, अँक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी ’अप्सरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना  मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच-करण्यात आला असून चित्रपट 10 मेपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलावंत, निर्माता व दिग्दर्शक यांनी आज देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहात माध्यमांशी संवाद साधून जवळच्या  चित्रपटगृहात हा सिनेमा पहावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
सुनील भालेराव यांच्या ’श्रमण फिल्म्स’ या निर्मिती न संस्थेतर्फे ’अप्सरा’ चित्रपटाची-निर्मिती करण्यात आली असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश कांगणे यांनी केले असून त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. गायक अभय जोधपूरकर, गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली ही गीते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहेत. अभिनेता सुयश झुंजुरके, अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, सचिन कुमावत, विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग, समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. राजा फडतरे यांनी छायांकन, निलेश राठोड यांनी संकलन, सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माझिरे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. एका तरुणाच्या मनात असलेले एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर ’अप्सरा’ हा चित्रपट बेतला आहे. अनोखी प्रेमकथा अप्सरा चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथेचा अंदाज येतो. तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण, त्या सगळ्याला तो तरूण कसा सामोरा जातो याचं कथानक चित्रपटात आहे. गाणी, उत्तम अभिनय यासर्वाना अँक्शनची जोडही कमालीची आहे. चैतन्य उद्योग समूहात गणेश दादा भांड  यांनी सर्व कलाकारांचा सन्मान केला आहे.

COMMENTS