Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंना हवा होता नितीन देसाईंचा स्टुडिओ

भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर रविवारी हिंगोलीत जहरी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद राज्य

कोरोना काळात अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचे काम प्रशंसनीय : पालकमंत्री
solapur : काँग्रेस पक्षाच्यावतीने मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन (Video)
LOK News 24 I सुपरफास्ट महाराष्ट्र दुचाकी चालवण्याच्या वादातून तरुणाची हत्या l पहा LokNews24

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर रविवारी हिंगोलीत जहरी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून, सोमवारी भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप करत, त्यांना नितीन देसाईंचा स्टुडिओ हवा होता, त्यासाठी ठाकरे कुटुंबियांच्या वतीने देसाईंना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून गंभीर आरोप करतांना म्हटले आहे की, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना मातोश्रीच्या निकटवर्तीयांनी धमकी दिली होती.ठाकरे नामक सिनेमाचे शूटिंग देसाईंच्या एनडी स्टुडिओत झाले होते. त्याचे त्यांना पैसे देण्यात आले का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नितीन देसाई यांनी नुकतीच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. पण भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. नितीन देसाई एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा एनडी स्टुडिओ उद्धव व रश्मी ठाकरेंना हवा होता. यासाठी देसाई यांच्यावर दबाव टाकला जात होता. या प्रकरणी ’मातोश्री’च्या जवळचा एक माणूस देसाईंना वारंवार धमक्या देत होता. ठाकरे सिनेमाचे शूटिंगही एनडी स्टुडिओत झाले होते. त्याचे त्यांनी पैसे दिले का? असे नितेश राणे म्हणाले. आम्ही उद्धव ठाकरेंवर टीका केली की, आमची जीभ घसरल्याची बातमी पसरते. पण एका उपमुख्यमंत्र्यांवर बोलताना ठाकरेंची जीभ घसरली असे कुणीही म्हणत नाही. पण आम्ही आता त्यांची टीका व्याजासकट परत करू. आता जे जे बाहेर येईल, ते ऐकून स्वतःच्या घरात बसून रडू नका, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी गत काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांत सातत्याने चिखलफेक सुरू आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच नितीन देसाई यांचे दुःख काय होते, हे मला माहिती होते, मी तोंड उघडले तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे विधान केले होते. त्यानंतर सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे होता, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी केंद्राला अभिनेता सनी देओल याला जो न्याय दिला, तो देसाईंना का दिला नाही? असा सवाल केला होता. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तिखट पलटवार केला होता. नितीन देसाई उद्धव ठाकरेंकडे मदत मागण्यास गेले, तेव्हा ठाकरेंनी कोणतीही मदत न करता त्यांना दरवाजातून हाकलून दिले, असे ते म्हणाले.

राऊत व आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार – भाजप आमदार नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. 2024 ला मोदींचे सरकार येईल आणि संजय राऊत आतमध्ये जाईल. एवढेच नव्हे तर त्यांच्या मालकाचा मुलगाही (आदित्य ठाकरे) मुलगाही तुरुंगात जाईल. त्यानंतर हे दोघे आर्थर रोड तुरुंगात एकत्र गोट्या खेळत बसतील. एकनाथ शिंदे कौतुकास पात्र आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होते. याऊलट राऊतांचा मालक शिव्या खाण्याच्या लायक असल्यामुळे शिव्या खातो, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले. मी उद्धव ठाकरे यांना नपुंसक म्हटले तर राग येईल. फावड्या म्हटले तरी राग येईल. त्यांनी सख्ख्या भावांसोबत काय केले? स्वतःच्या वडिलांना ते आणि त्यांचे कुटुंब म्हातारा व कुत्रा म्हणायचे. तो म्हातारा जेवला का? असे म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी घातलेले रुद्राक्ष यांनी फेकून दिले होते, असा गंभीर आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला.

COMMENTS