Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांचा नाहक बळी ः नीलम गोर्‍हे

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा काही बाबतीत नाहक बळी जात असल्याचा दावा विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या शिंदे गटात

हिंगणी ग्रा.पं.सदस्य माजी मंत्री क्षीरसागर गटात
जमिनीच्या वादातून भावकी मध्ये वाद एकमेकांवर कुऱ्हाडीने केला हल्ला.
मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेवर बिबट्याचा हल्ला | DAINIK LOKMNTHAN

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा काही बाबतीत नाहक बळी जात असल्याचा दावा विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेल्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शिंदे गटातील प्रवेशाविषयी आपली भूमिका नीलम गोर्‍हेंनी बुधवारी स्पष्ट केली.
यावेळी बोलतांन त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांनी मला कायम मदत केली. त्यांनी मला आमदारकीच्या वेळीही सहकार्य केले. माझ्यासाठी शब्द टाकला. त्यामुळे त्यांच्याविषयी मी फारसे बोलत नाही. पण त्यांच्या पत्रकार परिषदेवर बोलायचे झाल्यास, शिवसेनेचा प्रत्येक प्रवक्ता ज्यावेळी काही बोलतो तेव्हा त्याला पक्षाकडून जे सांगितले जाते तेच तो बोलत असतो. त्यानुसार, आक्रमकपणे भूमिका मांडणारा नेता म्हणून संजय राऊतांकडे ती भूमिका आली होती. त्याचा संजय राऊतांना खूप त्रास झाला. मला वैयक्तिक असे वाटते की, संजय राऊत यांचा यात विनाकारण बळी गेला, असे नीलम गोर्‍हे म्हणाल्या. यावेळी संजय राऊतांची पाठराखण करताना नीलम गोर्‍हे यांनी राऊतांची चूकही दाखवली. त्या म्हणाल्या-प्रत्येक प्रवक्त्याच्या कौशल्यावर त्याच्या पक्षाची बाजू जनतेपुढे जात असते. एखादी गोष्ट पक्षाने सांगितली तर ती कोणत्या भाषेत मांडायची, हे त्या प्रवक्त्याने ठरवले पाहिजे. संजय राऊत आक्रमक बोलतात म्हणून त्यांच्यावर नक्कीच टीका केली जाऊ शकते. काहीजण आक्षेपही घेऊ शकतात. पण ते जे काही बोलतात ते पक्षाने सांगितलेले असते. त्यामुळे त्यांचा बळी जात असल्याचे म्हणता येईल, असे नीलम गोर्‍हे म्हणाल्या.

COMMENTS