Homeताज्या बातम्या

पोलिस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथीलता

मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यसरकारने पोलिस भरती संदर्भातील जाहिरात काढल्यानंतर प्रशासकीय कारण देत या भरतीला तात्पुरती स्थगित

संतापजनक! शिक्षकाने मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास रोखले.
टँकर-बसचा भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू
रोहमारे कुटूंबाचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान : आमदार सुधीर तांबे

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यसरकारने पोलिस भरती संदर्भातील जाहिरात काढल्यानंतर प्रशासकीय कारण देत या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र शुक्रवारी राज्य सरकारने पोलिस भरतीच्या कमाल मर्यादेत शिथीलता दिल्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणार्‍या हजारो उमेदवारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
यंदा असलेल्या पोलीस भरतीमध्ये हजारो रिक्त पदे भरण्यात येणार होती. मात्र कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्‍नचिन्ह होतं. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. अंतर आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

COMMENTS