पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायफळ बोलू नये – विद्या चव्हाण यांचा घणाघात

Homeताज्या बातम्या

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायफळ बोलू नये – विद्या चव्हाण यांचा घणाघात

अमरावती प्रतिनिधी - भाजप हिंदूंना मूर्ख बनवत आहे. महागाई कधी कमी होईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं. आता नरेंद्र मोदी यांनी वायफळ बोलू

आशा सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपये वाढ l DAINIK LOKMNTHAN
वंचितकडून विधानसभेसाठी 11 उमेदवारांची घोषणा
लोहा तालुक्यातील वादळी वार्‍यासह गारपीट

अमरावती प्रतिनिधी – भाजप हिंदूंना मूर्ख बनवत आहे. महागाई कधी कमी होईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं. आता नरेंद्र मोदी यांनी वायफळ बोलू नये,तर अधिवेशनात सुद्धा महागाईवर कोणी बोलत नाही. कामख्या देवीचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीची खुर्ची मिळवली, कामाख्या देवीचे दर्शन घेऊन इथल्या महाराष्ट्रातल्या देवीचा हा अपमान आहे अशी  टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अमरावतीत पंतप्रधान मोदी व शिंदे -फडणवीस सरकारवर केला, राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे राज्यभरात महागाई व बेरोजगारी विरोधात जनजागरण यात्रा सुरू आहे यावेळी अमरावतीत सुद्धा ही जनजागर यात्रा पोहोचली असून यावेळी महागाई व बेरोजगारी कशी वाढली या संदर्भात चित्रफीत दाखवण्यात आली.

COMMENTS