https://www.youtube.com/watch?v=ylXzaqI__t4 भारत आणि बांगलादेश सीमेवर सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्
भारत आणि बांगलादेश सीमेवर सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेमुळे सीमेवरील अनेक भागांत संशयास्पद आणि बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचे मोठे गट एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘पहचानो, हटाओ और वापस भेजो’ (ओळखा, बाजूला करा आणि परत पाठवा) या धोरणामुळे घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत. उत्तर २४ परगणा आणि मालदा जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून जी दृश्ये समोर येत आहेत, ती पाहता या भागात मोठी हालचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत केवळ राजकीय भाषणांमध्ये ऐकायला मिळणारी घुसखोरविरोधी मोहीम, आता थेट प्रशासकीय कारवाईच्या रूपात जमिनीवर उतरताना दिसत आहे.

COMMENTS