Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भातील अनेक गावांना पावसाचा तडाखा

वर्धा ः विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसेच यवतमाळमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊ

मित्राला सोडून परतताना बाईक झाडावर आदळली, तरुणाचा जागीच अंत | LOKNews24
नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर18 जून रोजी मतदान; जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज
न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय ? 

वर्धा ः विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसेच यवतमाळमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील अनेक गावांना वादळ, गारपीट, अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आहे. संत्र्याची झाडे उन्मळून पडल्यामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्र्याची मोठ्याप्रमाणात गळतीही झाली आहे. जमिनीवर संत्र्यांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

COMMENTS