ममता बॅनर्जीचे भाजपविरोधी आघाडीचे संकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ममता बॅनर्जीचे भाजपविरोधी आघाडीचे संकेत

भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज

मुंबई : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँगे्रसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी कंबर कसली असून, बुधव

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पावर सहा नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा l पहा LokNews24
लातूर जिल्हा बँक ढोबळ नफ्यामध्ये राज्यात अव्वल
भाजीपाल्याचे दर कडाडले

मुंबई : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँगे्रसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी कंबर कसली असून, बुधवारी त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी यावेळी पवार यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, रामराजे ना. नाईक, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी आघाडी उघडण्याचे संकेत दिले असून, भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज देखील त्यांनी सांगितली. तसेच, ममता बॅनर्जींनी मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. या चर्चेमध्ये बोलताना भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीचे त्यांनी संकेत दिले आहेत. वाय. बी. सेंटरमध्ये ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या चर्चेमध्ये स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता. या चर्चेदरम्यान राजकीय मुद्द्यांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगतानाच भाजपाविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिले. देशात भाजपाला पराभूत करायचं असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. जर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पराभूत करणे सोपे आहे, असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी नमूद केले.
तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपासोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. पश्‍चिम बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मला बाहेर पडावे लागले. जेणेकरून इतरही (प्रादेशिक पक्ष) बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल, असे देखील त्यांनी नमूद केले. ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई दौर्‍यामध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीचं देखील नियोजन केलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही भेट रद्द करावी लागली. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी ममता बॅनर्जी राजस्थानच्या दौर्‍यावर देखील जाणार आहेत. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी याआधीच जाहीर केले आहे.

प्रादेशिक पक्षांना साथ देणार
ममता बॅनर्जी या मुंबईत असल्याने टीएमसी महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा होत्या. ममता बॅनर्जी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. टीएमसी महाराष्ट्रात सक्रिय होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही. मात्र, जिथं जिथं प्रादेशिक पक्ष चांगलं काम करत आहेत. ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष भाजपसमोर ताकदीने उभे राहत आहेत. त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उभे राहणार आहोत. आम्ही त्या ठिकाणी शिरणार नाही. तिथे प्रादेशिक मित्रांनाच साथ देणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठीच भेट ः शरद पवार
ममता बॅनजी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बोलतांना पवार म्हणाले की, भाजपला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता असून, यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं देखील ते म्हणाले. आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर सारख्या विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासोबतच, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. 2024च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे, असे पवार म्हणाले.भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज

COMMENTS