Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावल्या कोयना-महाराष्ट्र एक्सप्रेस

विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमसातारा / प्रतिनिधी : राज्य शासनाने मागील दोन वर्षात राबविलेल्या विविध विकासकामे आणि योजना

भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही
Shevgaon : केदारेश्वर कारखान्याची ३२ वी ऑनलाइन वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न (Video)
प्राध्यापक प्रतिभारत्न राष्ट्रीय पुरस्काराने प्रो. डॉ. सविता मेनकुदळे सन्मानीत

विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम
सातारा / प्रतिनिधी : राज्य शासनाने मागील दोन वर्षात राबविलेल्या विविध विकासकामे आणि योजनांची माहिती लांब पल्यांच्या एक्सप्रेस रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सातारा जिल्ह्यातून कोयना एक्सप्रेस (कोल्हापूर ते मुंबई) आणि महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर ते गोंदिया) धावणार्‍या एक्सप्रेसची निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षात राबविलेली विकासकामे आणि योजनांची आकर्षक पध्दतीने माहितीसह या दोन्ही एक्सप्रेस प्रवास करत आहे.
राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, कार्यक्रम यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेवरुन प्रसारित करण्यात आलेल्या विविध योजनांची प्रवासी, स्थानिक लोक माहिती घेत आहेत.
भाऊसाहेब राजे रेल्वे प्रवासी यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडी शासनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शासनाने दोन वर्षात केलेल्या कामांची व विविध योजनांची माहिती रेल्वेच्या बोगींवर लावण्यात आली आहे. हा उपक्रम सुंदर असून यातून नागरिकांना शासनाने केलेल्या दोन वर्षातील सुधारणा, वारकरी संप्रदाय, शेतकर्‍यांची कर्ज माफी यासह अनेक केलेल्या कामांच्या माहितीबरोबर नागरिकांसाठी असणार्‍या विविध योजनांची माहिती होत आहे.
रेल्वेवर लावलेल्या विविध जाहिराती अत्यंत आकर्षक व सुंदर आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती घऊन नागरिकांनी लाभ घ्यावा. महाविकास आघाडी शासनाने या पुढे असेच जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी भाऊसाहेब राजे यांनी व्यक्त केली.
‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची, ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ अंतर्गत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यात कौशल्य विकास-रोजगार मेळावा आणि वेबपोर्टलद्वारे दीड लाख बेरोजगारांना रोजगार, महिला सक्षमीकरणातंर्गत कुटूंबातील महिलांच्या नावावर घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्यांची सूट, कोरोना महामारीत पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखांची मुदत ठेव योजना, चिंतामुक्त शेतकरी, मोफत 7/12 आता दारी येणार, ई-पीक पाहणी नोंदणी करता येणार, जिथे सारथी तिथे प्रगती-क्षमता आणि कौशल्य वृध्दीसाठी शिक्षण-प्रशिक्षण, पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासनाचे प्राधान्य, विद्युत बस सेवेत वाढ राज्यातील प्रदूषणाला आळा आदी माहिती ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’द्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे.
राज्य शासनाची विकासकामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचाविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या एक्सप्रेस रेल्वे सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर आल्यानंतर बोगींवर लावण्यात आलेल्या आकर्षक जाहिराती प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.

COMMENTS