भारनियमनाविरोधात केडगावकर रस्ता रोकोच्या पवित्र्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारनियमनाविरोधात केडगावकर रस्ता रोकोच्या पवित्र्यात

ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील नगरचे उपनगर असलेल्या केडगाव येथील शितल कॉलनी, हनुमान नगर, इंदिरा नगर व विद्या नगर भागातील नागरिक रोजच्या आ

प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार म्हणून जबाबदारी पार पाडा ः आ. मोनिका राजळे
दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
केडगाव उपनगरामध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील नगरचे उपनगर असलेल्या केडगाव येथील शितल कॉलनी, हनुमान नगर, इंदिरा नगर व विद्या नगर भागातील नागरिक रोजच्या आठ तासांच्या भारनियमनाने त्रस्त झाले असून, ते थांबले नाही तर रस्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, या भागाचे विद्युत कनेक्शन हे अरणगाव या ग्रामीण भागाशी जोडण्यात आले आहे व त्यामुळे तेथे रोज 8 तासाचे भारनियमन होत आहे. मात्र, येथील नागरिक महापालिकेचे सर्व कर भरत असल्याने महापालिका हद्दीप्रमाणे कमी वेळेचे भारनियमन आवश्यक आहे. अन्यथा, हा भाग देखील ग्रामपंचायतीमध्ये विलीन करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
केडगाव येथील शितल कॉलनी, हनुमान नगर, इंदिरा नगर व विद्या नगर भागात रात्री आठ ते दहा तासाचे होत असलेले भारनियमन त्वरीत थांबविण्याच्या मागणीचे निवेदन सहारा प्रतिष्ठान, रेणुकामाता महिला मंडळ व स्थानिक नागरिकांच्यावतीने विद्युत महावितरण कार्यालयात देण्यात आले. यावेळी सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबरनाथ भालसिंग, रेणुकामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता पवार, गणेश नन्नावरे, शीतल नाडे, उषा गोरे, अनिता बेंद्रे, मनीषा थोरवे, सरस्वती भगत, रेखा मोर्या, शुभांगी लोणकर, सुनीता रोडे, जयश्री रासकर, शकीला पठाण, पल्लवी चोभे, निर्मला इंगळे, विश्‍वास काळे, दीपक आल्हाट, प्रवीण शिंदे, अमोल भालसिंग आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाळ्यात उकाडा वाढत असताना नागरिकांना रात्री घरी थांबणे देखील असह्य झाले आहे. हा भाग महापालिका हद्दीत येतो. मात्र येथील विद्युत कनेक्शन हे अरणगाव या ग्रामीण भागाशी जोडण्यात आले आहे. नागरिक महापालिकेचे सर्व कर भरत असून, महापालिका हद्दीप्रमाणे कमी वेळेचे भारनियमन आवश्यक आहे. अन्यथा हा भाग देखील ग्रामपंचायतीमध्ये विलीन करण्याचे निवेदनात म्हटले आहे. भारनियमन बंद झाले नाही तर नागरिकांनी रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाळयात विद्युत महावितरणकडून होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहे.

COMMENTS