Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवडमध्ये श्री सिध्दनाथांचे अतिकडक असे उभ्या नवरात्राचे व्रत सुरु

म्हसवड / वार्ताहर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वर

कला पथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत
भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही
जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा निवेदनाद्वारे इशारा

म्हसवड / वार्ताहर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरीयांच्या संपूर्ण एक महिना चालणार्‍या शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरु असे दीवाळी पाडवा ते तुलसी विवाह या 12 दिवसाच्या दरम्यान परंपारिक पध्दतीने व पूर्वापार चालत आलेले उभ्या नवरात्राचे अतिशय कडक व्रत सध्या सिध्दनाथ मंदिरात सुरु झाले आहे.
म्हसवड येथील माणगंगेच्या तिरावर दहाव्या शतकातील अत्यंत प्राचिन असे हेमाडपंथी मंदीर उभे आहे. तेंव्हापासून आज अखेर या मंदिरात परंपरागत चालत आलेल्या अनेक धार्मिक उपासना व अत्यंत कडक अशा व्रतांची अखंड आणि अव्याहत प्रथा अत्यंत मनोभावे सुरु असून उभे नवरात्रही अतिशय कडक आणि कठीण अशी उपासना आहे.
अनेक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व अराध्य दैवत असलेल्या येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी देवीदेवतांचा पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरेनुसार हळदी-विवाह-आणि वरात या मंगल विवाहाच्या पायर्‍या आहेत. त्यानुसारच श्रींचा तब्बल एक महिना चालणारा विवाह सोहळा अनेक धार्मिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो.
एक महिन्याच्या विवाह सोहळ्यातील सर्वात महत्वाचे व मुख्य असे हे 12 दिवस समजले जातात. कार्तिक शु. प्रतिपदा (दीपावली पाडवा) ते कार्तिक शु. प्रतिपदा (तुलसी विवाह) दरम्यान, दिवाळी पाडव्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी – सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेच्या दिवसापासून श्रींचे 12 दिवसांचे नवरात्राचे उपवास सुरु होतात. 12 दिवसानंतर तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता हे घट उठविले जातात. त्यावेळी 12 दिवसाच्या नवरात्राची समाप्ती होते, म्हणजेच उपवास सोडले जातात.
हे 12 दिवसाचे नवरात्राचे उपवास करणारांना या12दिवसात दररोज पहाटे चार वाजता कार्तिकस्नान करुन नगरप्रदक्षिणा घालावी लागते. या नगरप्रदक्षिणेची सुरुवात श्रींच्या मंदिरापासून होते. श्री सिध्दनाथ मंदिरापासून महादेव मंदीर, माणगंगा नदीपात्रातून, बाजार पटांगण मार्गे विठ्ठल मंदीर, जोतिबा मंदीर, बसस्थानका समोरुन खंडोबा मंदीर, सिध्दनाथ हायस्कूलमार्गे श्री संत गाडगेबाबा समाधी मंदीर, तुळजाभवानी मंदीर, वडजाई ओढामार्गे लक्ष्मी, मरीआई मंदीर, रथग्रह मार्गे, महादेव मंदीर, मारुती-शनि मंदीर, श्रीनाथ मठातून पुन्हा श्री सिध्दनाथ मंदीर अशा मार्गे दररोज श्रींच्या नावाचा जप करीत, श्रींचा महिमा सांगणारी गीते गात, नगरप्रदक्षिणा घालावी लागते. या 12 दिवसामध्ये जे रविवार येतात त्या रविवारी हे नवरात्र करणारांना गावापासून सुमारे तीन कि. मी. अंतरावर असणार्‍या राजाच्या बागेतील म्हातारदेव मंदिरात व तिथून परत येताना वडजाई मंदीर या ठिकाणी प्रदक्षिणेसाठी जावे लागते.
उभे नवरात्र करणारांमध्ये केवळ पुरुषांचाच सहभाग असतो. अध्यापपर्यंत कोणत्याही महिलेने उभे नवरात्र केले नाही. उभे नवरात्र करणारांना धोतर नेसून, खांद्यावर उपरणे घेऊन, हातात तांब्याच्या कलशातही उदक घेऊन, पायात वाहाणा न घालता ही नगरप्रदक्षिणा 12 दिवस घालावी लागते. 12 दिवस तोच पेहराव ठेवावा लागतो. या 12 दिवसात पायात चप्पल घालावयाची नसते, गावाची वेस ओलांडून परगावी जायचे नसते, नगर प्रदक्षिणेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो, अहोरात्र 12 दिवस उभे रहावे लागते. रात्री झोपताना टेबलवर पालथे झोपले तरीनिदान एक पाय तरी जमिनीवर ठेवावा लागतो. झोपेमध्ये जर दोन्ही पायवर घेतले गेले तर त्याचे उभे नवरात्र मोडले, असे समजले जाते. या 12 दिवसात जमिनीवर मांडी घालून बसावयाचे नसते. दिवाळी पाडव्यापासून हे नवरात्र सुरु होत असले तरी पाडव्यादिवशी पहाटे जेंव्हा जाग येईल, तेंव्हापासून उभे नवरात्र करणारांना उभे रहावे लागते. पूर्ण बारा दिवस श्रींचा जप करत, शुध्द मनाने, आचरणाने, पावित्र्य राखून, उभे राहूनच श्रींची उपासना करावयाची असते.
शनिवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता हे 12 दिवसाचे घट उठणार आहे. श्रींचे नवरात्राचे उपवास सुटणार आहेत. त्याच दिवशी रात्री 12 वाजता श्रींचा शाही मंगल विवाह सोहळा पारंपारिक व धार्मिक विधीपूर्वक, मोठ्या थाटात होणार आहे.
12 दिवसांच्या या अतिशय कडक व कठीण अशा उभ्या नवरात्राची ही प्रथा पूर्वापार, पारंपारिक पध्दतीने आज अखेर तितक्याच श्रध्देने, भावनेने व मनापासून येथील पुजारी मंडळी व भाविकांनी अतिशय पावित्र्य राखून अखंडीतपणे व अव्याहत सांभाळलेली असून दिवसेंदिवस उभे नवरात्र करणारांची संख्या वाढत आहे.

COMMENTS