Homeताज्या बातम्या

पेट्रोल-डिझेल टंचाई आणि महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन

बीड : राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग कमालीचा अडचणीत सापडला आहे. या वाढत्या महागाईच्या आणि इं

मायबाप सरकार प्रकाशदादा, विजयसिंह पंडित राजे चिमुकल्यांवर दया करा…..झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे
स्ट्रक्चरल ऑडिटची नाटकं बंद करा, मोडकळीस आलेल्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा-डॉ.गणेश ढवळेन्यायालयाच्या निर्देशांकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
देवाभाऊंचे शेतकर्‍यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा!जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन; डॉ. गणेश ढवळे यांचा शासनावर निशाणा

बीड : राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग कमालीचा अडचणीत सापडला आहे. या वाढत्या महागाईच्या आणि इंधन तुटवड्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी वाहनांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात ‘राम नाम सत्य है, पेट्रोल बडा महेंगा है’ अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात शेख युनुस, शेख मुबीन, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, माजी सैनिक अशोक येडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले आहे की, ऐन उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या हंगामात अनेक पेट्रोलपंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकत असल्याने वाहनधारक हवालदिल झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना कॅन किंवा डब्यांमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने ट्रॅक्टर आणि पाण्याचे पंप ठप्प झाले आहेत. यामुळे शेतीची मशागत खोळंबली असून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

COMMENTS