Homeताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी हवालदिल

जळगाव प्रतिनिधी - चोपडा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र शेतातील उभे असलेले प

वेकूलच्‍या आऊटग्रो विभागाकडून सिंचन अधिक कार्यक्षम करण्‍यासाठी GWX100 लॉन्‍च  
नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपणसाईयोग फाउंडेशनचा हरित उपक्रम ; राहात्यात १२ फूट वटवृक्षाची लागवड
आष्टी तालुक्यातील केळ सांगवी येथील ड्रॅगन फ्रूट,खजूर,सफरचंद बागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी – चोपडा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र शेतातील उभे असलेले पीक या वादळामुळे जमिनीवर आडवे पडले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतातील पीक डोळे समोर आडवे पडलेले पाहून शेतासाठी लागलेला खर्च कसा निघेल या संकटात सापडला आहे. तर काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस आल्याने तीच चिंता असताना निसर्गाने या वादळामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून  घेतला आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पन्नातून कर्ज फेडले गेले असते, कर्ज नाही तर कमीत कमी त्या कर्जावरील व्याज तरी फेडले गेले असते, अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकरी करीत आहेत. 

COMMENTS