‘बाय बाय यश समीर’

Homeताज्या बातम्या

‘बाय बाय यश समीर’

यश-समीरचा शेवटचा सीन शूट करताच संकर्षण झाला EMOTIONAL

सध्या अनेक नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बऱ्याच जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असलेल्या पहायला मिळतायेत. अशातच झी

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
उदयनराजेंनी असा भरवला पेढा की सगळे पाहतच राहिले!
महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची स्थापना  सारिका क्षीरसागर यांची उपस्थिती

सध्या अनेक नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बऱ्याच जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असलेल्या पहायला मिळतायेत. अशातच झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिका सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अशातच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील सर्वांचा आवडता समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं(Sankarshan Karhade) त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं समीर आणि यशच्या शेवटचा सीन शूट झाल्याचं प्रेक्षकांना सांगितलं. यावेळीचे फोटो शेअर करत त्यानं एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. 

COMMENTS