Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढत्या गुन्हेगारीवरुन भुजबळांचा पोलिस आयुक्तांना इशारा 

नाशिक प्रतिनिधी :-  शहरात दिवसाआड एकाचा खून होतोय. हे प्रकार पोलिस आयुक्तांना आवरावे लागतील. सरकारने त्यासाठीच त्यांची नेमणूक केली आहे. पोलिस आयु

40 वर्षीय मामीचा 16 वर्षीय भाच्यावर बलात्कार
मराठा आरक्षणासाठी ‘क्युरेटिव्ह याचिका’
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांना मिळेनात बेड ; एका खाटेवर दोन रुग्ण

नाशिक प्रतिनिधी :-  शहरात दिवसाआड एकाचा खून होतोय. हे प्रकार पोलिस आयुक्तांना आवरावे लागतील. सरकारने त्यासाठीच त्यांची नेमणूक केली आहे. पोलिस आयुक्त गुन्हेगारी थोपविणार नसतील, तर त्यांना एक दिवस जनतेचा उद्रेक पाहावा लागेल. खून होत राहतील आणि तुम्ही फक्त बघत राहाल, असे चालणार नाही. अन्यथा नाशिकच्या जनतेसाठी आम्हाला उठाव करावा लागेल, असा इशारा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिला.

भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत मी विधानसभेतही बोललो. पोलिस दलाला वाहने हवी असतील, मनुष्यबळ हवे असेल तर सरकारने ते पुरवायला हवे. परंतु, गुन्हेगारी नियंत्रणात आलीच पाहिजे. सरकारच्या स्तरावर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी होताना दिसत नाही, अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली. गतवेळी आम्ही कुंभमेळ्याची बरीच तयारी केली. अनेक कामे मार्गी लावली. परंतु, नेमके कुंभमेळ्याच्यावेळी सरकार बदलल्याने काही कामे अपूर्ण राहिली. कुंभमेळा तीन-चार वर्षांवर येऊनही अर्थसंकल्पात काही तरतूद केली नसल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. साधूग्रामच्या जागा, कुंभमेळ्याच्या जागांबाबत काय करता येईल, यासंदर्भातील सूचना केल्या असून, त्यावर काम होणे आवश्यक आहे. शेतकरी, लॉन्समालकांना चांगला मोबदला मिळाला तर त्यांच्या जागा ते कुंभमेळ्यात वापरण्यासाठी देऊ शकतात. त्यांना रितसर परवानगी देण्याबाबत आतापासूनच विचार व्हावा असे, ते म्हणाले.

जनतेचे कोर्ट सगळ्यात मोठे – आपल्याकडे भद्रकालीत गुन्हा घडला तर अंबड पोलिस स्टेशनवाले तो दाखल करून घेत नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकात बोलले आणि केस सुरतमध्ये दाखल होते, हे काही समजत नाही. कर्नाटकातच केस का दाखल केली नाही, हा सवाल आहे. सुरत न्यायालयात केस सुरू असताना न्यायाधीशही बदलले गेले. जनतेचे कोर्ट सगळ्यात मोठे असते, हे लक्षात ठेवायला हवे. स्वातंत्र्यासाठी झगडणारे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेकांना ब्रिटीशसुद्धा नमवू शकले नाहीत. त्यांना संपवू शकले नाहीत. हा सव्वाशे कोटी लोकसंख्येचा भारत देश आहे, हे लक्षात ठेवावे, असा इशारा भुजबळ यांनी भाजप सरकारला दिला. नीरव मोदी हजार कोटी रुपये घेऊन गेले असतील, तर त्यांच्याबाबत बोलायचे नाही, असे कसे चालेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पर्यावरणाला धक्का लावू नका – चुंचाळेत पांजरापोळ किती प्रमाणात आहे, हा अभ्यासाचा विषय आहे. तेथील पर्यावरणाला, झाडांना धक्का लावू न देता आयटी पार्क आणता येईल का, तेथे पर्यावरण सांभाळून पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का, याचा विचार करून पुढे गेले पाहिजे. नाशिकमध्ये उद्योगवाढीच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने तशी जागाच नाही, याचाही विचार आपण करायला हवा, असे भुजबळ म्हणाले. त्रिमूर्ती चौक परिसरात जुनी झाडे तोडून उड्डाणपूल कशासाठी बांधायचा? गरज नसताना केवळ कुणाच्या आर्थिक फायद्यासाठी चारशे कोटींचे प्रकल्प राबविण्याचा विचार महापालिका का करते? आपल्यापेक्षा छोट्या शहरांत मेट्रो धावत असताना आपल्याकडे निओ मेट्रो का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

COMMENTS