Homeताज्या बातम्यादेश

गोध्रा जळीतकांडातील 8 दोषींना जामीन

नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा इथे 2002 साली झालेल्या रेल्वे जळीत कांडातील आठ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या गुन्हेग

संजय राऊत तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते ः केसरकर
नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात कोट्यवधींच्या निधीचा फेरफार? धाराशिव-बीडच्या तंत्रनिकेतनचा निधी अन्य कामांवर खर्च; अधीक्षक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
राहाता बस स्थानकातील प्रसाधनगृहातील पाणी रस्त्यावर

नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा इथे 2002 साली झालेल्या रेल्वे जळीत कांडातील आठ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या गुन्हेगारी कटात सहभागी असलेल्या अन्य चार जणांना मात्र त्यांच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून जामीन नाकारण्यात आला.  सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. गोध्रा रेल्वे स्थानकावर 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसचे काही डबे जाळण्यात आले होते. त्यात किमान 58 जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती. गोध्रा जळीत कांड प्रकरणी स्थानिक न्यायालयाने 2011 साली 12 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती आणि 63 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. ट्रायल कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली होती.

COMMENTS