Homeताज्या बातम्यामनोरंजन

आई कुठे काय करते’ मालिकेत अखेर अरुंधती देणार प्रेमाची कबुली

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मध्ये आतापर्यंत इशाच्या लग्नाच्या ट्रॅक पुढे नेण्यात येत होता. आता त्यात संजना आणि अनिरुद्ध

जयराम रमेश विरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार
Alandi : आळंदीत शासन निर्णयाचे स्वागत
फ्लिपकार्टवर ३,९९९ मध्ये आयफोन 14 खरेदी करण्याची संधी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये आतापर्यंत इशाच्या लग्नाच्या ट्रॅक पुढे नेण्यात येत होता. आता त्यात संजना आणि अनिरुद्ध यांच्या भांडणाची भर पडली आहे. अनिरुद्धने संजनाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन जो तमाशा केला तो आता संजनाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे आता ती अनिरुद्धला कधीही माफ करणार नाहीये. आशुतोष तिची माफी मागण्यासाठी येणार आहे मात्र त्यातही त्याचा स्वार्थच आहे. आपण जे केलं ते योग्यच केलं फक्त आपली पद्धत चुकली असं त्याचं म्हणणं आहे. आता त्याच्या या गोड बोलण्याला आपण भुलणार नसल्याचं संजना सांगणार आहे. दुसरीकडे इशा आणि अनिशच्या लग्नाची तयारी पाहायला मिळतेय. त्यांच्या साखरपुड्याची तारीख काढली जाणार आहे.

इशा आणि अनिशच्या साखरपुड्याची तारीख काढण्यासाठी आप्पा आणि कांचनताई केळकरांच्या घरी येणार आहेत. त्यात कांचन या त्यांच्या पत्रिका जुळवून पाहण्याचा हट्ट करणार आहेत. त्यावर सगळेच त्यांना समजावणार आहेत. पात्रिका नाही जुळल्या तरी त्यांचं लग्न होणारच आहे त्यामुळे पत्रिका पाहून काही उपयोग नाही. त्यांचं लग्न त्यांनी टिकवलं पाहिजे असं सुलेखा ताई म्हणणार आहेत. त्यावर सगळ्यांचं एकमत होणार आहे. लवकरच मालिकेत इशाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्या गोंधळात आशुतोषच्या प्रयत्नांना यश येणार आहे. अखेर अरुंधती तिच्या आशुतोषवरच्या प्रेमाची कबुली देणार आहे. अरुंधती अगदी मान खाली घालून आशुतोषवरच्या प्रेमाची कबुली देणार आहे. मात्र ते तीन शब्द ऐकून आशुतोषचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहणार आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील दुरावा आता संपत आहे. आशुतोष अगदी लहान मुलीसारखी त्याची काळजी घेतो आहे. तिला खूप जपतो आहे. त्यामुळेच अरुंधती खूप सुखात आहे. प्रेक्षकांनादेखील तिला असं हसताना पाहायला आवडत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल.

COMMENTS