Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपवासात भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड । प्रतिनिधी उपवासाच्या काळात भगरचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मात्र भगरवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्न विषबाधा होण्याच्या घटना यापूर्वी घ

विठ्ठलनामाच्या जयघोषात आ. बालाजी कल्याणकर यांचा सुरमयी वाढदिवस साजराशास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या स्वरधारांनी नांदेडकर चिंब झाले, निसर्गालाही मोहित केले!
Nanded : देगलूर मध्ये ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलचे पूर्वतयारी व निर्जंतुकीकरण
Nanded : गुरफळीचे दुग्ध व्यावसायिक करतायेत नदीतून प्रवास (Video)

नांदेड । प्रतिनिधी
उपवासाच्या काळात भगरचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मात्र भगरवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्न विषबाधा होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. दमट वातावरणामुळे बुरशी वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी भगर खरेदी व वापर करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पॅकबंद व लेबल असलेलीच भगर खरेदी करावी. पॅकिंग व अंतिम वापर दिनांक तपासावा. भगर कोरड्या व हवाबंद डब्यात साठवावी. जुनी किंवा जास्त दिवस साठवलेली भगर व पीठ वापरू नये. शक्यतो आवश्यक तेवढेच पीठ दळावे. सलग उपवास करताना भगर व शेंगदाणे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. भगर विक्रेत्यांनी मुदतबाह्य किंवा सुटी भगर विक्री करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा  2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी कळविले आहे.

COMMENTS