Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा यांचे आवाहन

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन

अजित पवारांसोबत गेलेल्यांना परत पक्षात घेऊ नका
अजित पवारांना मिळणार अर्थखाते ?
आशुतोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दुःखद घटनेतून राजकारण करण्याचे प्रयत्न अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. अशा खालच्या पातळीच्या राजकारणाला तात्काळ पूर्णविराम मिळाला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
अजित पवार यांसारखा राज्याचा जबाबदार उपमुख्यमंत्री आणि जनतेत लोकप्रिय असलेला नेता अचानक आपल्यातून निघून जाणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. अशा संवेदनशील प्रसंगी राजकीय स्वार्थासाठी घटना वेगवेगळ्या पद्धतीने मांडणे किंवा संशयाचे वातावरण निर्माण करणे हे समाजासाठी घातक असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रत्येक घटनेकडे राजकीय नजरेतून पाहण्याची प्रवृत्ती दुर्दैवी असून ती थांबली पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा धावपट्टीजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर समोर आलेल्या काही दृश्यांमुळे विविध तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. मात्र, या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पथकासह संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला असून, सखोल चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. मात्र, या सर्व घडामोडींना अनावश्यक राजकीय रंग देणे अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शोकाकुल वातावरणात संयम राखणे, कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान करणे आणि तपास यंत्रणांवर विश्‍वास ठेवणे हीच समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या दुःखद घटनेतून राजकीय फायदा घेण्याऐवजी एकत्रितपणे शोक व्यक्त करणे आणि सत्य बाहेर येऊ देणे हेच राज्याच्या हिताचे असल्याचे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

COMMENTS