Homeताज्या बातम्यामनोरंजन

परिणीती चोप्रानंतर आता कंगना रनौत अडकणार विवाह बंधनात ?

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री कंगना रानौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम वादाचा मुकुट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना वादाच

कंगना रणौतने घेतले त्र्यंबकेश्वरचे दर्शन
कंगना रनौत फिल्मफेअर विरोधात कोर्टात जाणार
कंगना रनौतचा ‘तेजस’ बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरफ्लॉप

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री कंगना रानौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम वादाचा मुकुट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. अनेकदा कंगना वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आली. पण आता कंगना तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रानौत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यानंतर कंगना लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा एका प्रसिद्ध अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. शिवाय कंगना उद्योजकासोबत लग्न करणार असल्याचा दावा देखील अभिनेत्याने केला आहे. ज्यामुळे कंगना हिचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं आहे. कंगना रनौत हिच्या खासगी आयुष्याचा मोठा खुलासा करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल राशिद खान उर्फ केआरके आहे. कंगना एप्रिल २०२४ मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचा दावा अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या ट्विटची चर्चा रंगली आहे

केआरके ट्विट करत म्हणाला, ‘अभिनेत्री कंगना रनौत हिचा साखरपुडा डिसेंबर २०२३ मध्ये उद्योजकासोबत होणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये कंगना विवाहबंधनात अडकणार आहे…! तिला खूप शुभेच्छा…!’ अभिनेत्याच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत… पण यावर कंगना हिने कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही एका मुलाखतीत कंगना रनौत हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती माझ्या आयुष्यात येणार असेल तर येईल.. मला लग्न करायचं आहे. माझं कुटुंब असेल अशी माझी देखील इच्छा आहे.. पण सर्व काही योग्य वेळ आल्यानंतर होईल…’ असं अभिनेत्री म्हणाली होती

COMMENTS