Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली महापालिकेवर ‘आप’चा झेंडा

भाजपची 15 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तब्बल दीड दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या दिल्ली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाने सत्ता हस्तगत केली आहे. 15 वर्षांपासून

मराठमोळ्या अवॉर्ड कार्यक्रमाला दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यांचा तडका !
कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली !
नगर अर्बनचे संचालक कोठारींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ; बायोडिझेलचा बेकायदेशीर वापर केल्याची तक्रार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तब्बल दीड दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या दिल्ली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाने सत्ता हस्तगत केली आहे. 15 वर्षांपासून भाजपची दिल्ली महानगरपालिकेवर सत्ता आहे. मात्र यंदा महापालिका निवडणुकीत रंगत आली होती. अखेर यात आपने बाजी मारत 250 जागापैकी 134 जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळविली आहे. तर भाजप केवळ 104 जागा जिंकू शकला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत 250 प्रभागांमध्ये एकूण 1349 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दिल्ली महापालिका निवडणुकीत 1.45 कोटी मतदार आहेत. यापूर्वी 2017 मध्ये, भाजपने तत्कालीन 270 पैकी 181 नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर आप फक्त 48 जिंकले होते. काँग्रेस 30 जागा जिंकून तिसर्‍या स्थानावर होती. मात्र यंदा झालेल्या निवडणुकीत आपने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता काबीज केली आहे.
दरम्यान, दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. आम्हाला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आणि केंद्र सरकारचं सहकार्य हवं आहे, असं केजरीवाल यांनी 15 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेतील सत्ता संपुष्टात आणल्यानंतर म्हटलं आहे. माझंही तुमच्यावर प्रेम आहे, अशी आपल्या भाषणाला सुरुवात करत केजरीवाल यांनी मतदारांचे आभार मानले. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजयी झाल्यानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांना केजरीवाल यांनी संबोधित केलं. ‘आप’च्या विजयामुळे दिल्लीमध्ये आता डबल इंजिनचं सरकार असणार आहे. 2015 पासून या ठिकाणी राज्यात ‘आप’ची सत्ता असून आता महानगरपालिकेवरही आपने झेंडा फडकवला आहे.

आम्हाला केंद्र सरकारची मदत हवी – केजरीवाल
भाजपाने अनेक मार्गावर आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’ ने केला आहे. केंद्रातील सरकार, नायाब राज्यपाल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून भाजपाने आमची अडवणूक केली असं ‘आप’ने म्हटलं आहे. आम्हाला केंद्र सरकारची मदत हवी आहे. आम्हाला पंतप्रधान आणि केंद्राच्या आशीर्वादाची गरज आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीमधून लोकांना सकारात्मक राजकारणाची आवश्यकता असून नाकारात्मक राजकारण त्यांनी दूर केलं आहे, असंही केजरीवाल म्हणाले. मी सर्व पक्ष आणि उमेदवारांना आवाहन करतो की आझपर्यंत आपण राजकीय वाद घातले. मात्र आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आम्हाला भाजप आणि काँग्रेसचं सहकार्य हवं आहे. आपण एकत्र येऊन दिल्लीतील समस्या सोडवू, असंही केजरीवाल म्हणाले.

दिल्ली महानगरपालिकेतील संख्याबळ –
आम आदमी पक्ष- 134
भाजप 104
काँगे्रस -9

COMMENTS