ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव

माजी मंत्री अनिल देशमुख यांचा भाजपवर आरोप

यवतमाळ प्रतिनिधी - ज्यात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही. त्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव आखल्या जात आहे, असा

नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावांमध्ये लम्‍पीचा अहवाल पॉझिटिव्ह
विकासासाठी आम्ही कोणाबरोबरही जाऊ शकतो ; खा. डॉ. विखेंची स्पष्ट भूमिका
अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळुन डॉक्टरने केली आत्महत्या

यवतमाळ प्रतिनिधी – ज्यात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही. त्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्याचा डाव आखल्या जात आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यवतमाळ येथे सत्कार कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे सपशेल खोटे होते. ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप लावण्यात आले होते. काही राजकीय मंडळींना हाताशी धरून षडयंत्र रचण्यात आले. त्या आरोपात काहीही तथ्य आढळून आले नाही. आरोप करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचेही माजी मंत्री देशमुख म्हणाले.

COMMENTS