Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड शहरात टोळी युध्दातून एकावर खूनी हल्ला

कराड / प्रतिनिधी : शहरात दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून काल सायंकाळी एकावर भर वस्तीत हल्ला झाला. विद्यानगर येथील होली फॅमेली स्कूलच्या चौकात भर व

माजी सभापती आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर
कराड शहरातील वखारीला मध्यरात्री भीषण आग
श्री संभुआप्पा बुवाफनची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून : मठाधिपती मिलिंद मठकरी

कराड / प्रतिनिधी : शहरात दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून काल सायंकाळी एकावर भर वस्तीत हल्ला झाला. विद्यानगर येथील होली फॅमेली स्कूलच्या चौकात भर वस्तीत झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आयुब दिलावर कागदी (वय 39, रा. गुरुवार पेठ) जखमीचे आहे. हल्लेखोर फरार आहेत. हल्ला करणारे बबलू माने टोळीशी संबधीत आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दहा दिवसांच्या फरकाने ही दुसरी घटना आहे. हल्लात कागदी गंभीर जखमी आहे. त्या घटनेचे शहरात पडसाद उमटल्याने मंडई परिसरात तणावाचे वातावरण होते. वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत तेथे उपस्थीत होते.

पोलिसांनी सांगितले की, काल सायंकाळी कागदी रिक्षा घेऊन दोन मुलांना शाळेत सोडण्यासाठी होली फॅमिली येथे गेला होता. तेथे बबलू माने यांचा मुलगा शिवराज माने होता. त्याने कागदीशी किरकोळ कारणावरुन वाद घातला. त्यांच्यावर सुरज धुमाळ व त्याचे अन्य दोन साथीदारांनी कोयता, चाकू व स्टम्पने हल्ला केला. त्याचा पाठलाग करून तुला आज खल्लास करून टाकतो. अशी धमकी देत पुन्हा त्याच्यावर वार केले. कागदी यांच्या डोक्यावर वार झाला आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शहर पोलीसात रात्री उशिरा झाली आहे.

COMMENTS