लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांची व्यथा पाहून प्रशासनाने १० जून रोजी तातडीने त्यांना एक बैल द

लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांची व्यथा पाहून प्रशासनाने १० जून रोजी तातडीने त्यांना एक बैल दिला. मात्र, हा बैल आधीपासूनच गंभीर आजारी असल्याचे आता समोर आले आहे.
शासकीय मदतीचा मोठा गाजावाजा करत पशुसंवर्धन विभागाने दिलेला हा बैल अवघ्या दोनच दिवसांत शेतात काम करताना खाली बसला आणि त्याने मान टाकली. यानंतर तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता, हा बैल गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळण्याऐवजी आता त्या आजारी बैलाच्या उपचाराचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS