Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुळ्या मुली झाल्याने त्यांची हत्या करणार्‍या बापावर गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः घरात मुलगा न झाल्याने दोन जुळ्या मुलींचा जन्म झाल्याने त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली होती. न्यायाल

ऐन रमजानमध्ये घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीचे पतीवर चाकूने वार
पत्नीचा गळा आवळून गुजरातला पळाला
Navi Mumbai : महिला डॉक्टर असल्याचा बनाव करत सोनाराची लूट (Video)

पुणे/प्रतिनिधी ः घरात मुलगा न झाल्याने दोन जुळ्या मुलींचा जन्म झाल्याने त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली होती. न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी वडिलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. याबाबत श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय 35, रा. साई संस्कृती सोसायटी, बायफ रस्ता, वाघोली,पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार याप्रकरणी मयत मुलींचे वडील अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय -62), सासू जयश्री सूर्यवंशी (55), दीर अमोल सूर्यवंशी (26) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2018 मध्ये तक्रारदार लोभे यांची बहीण उर्मिला यांचा विवाह अतुल याच्याशी झाला होता. विवाहानंतर मुलगाच हवा. मुल गोरे हवे, असे आरोपींनी उर्मिलाला सांगितले. दरम्यान, उर्मिला गर्भवती झाल्या. त्यांना रिद्धी आणि सिद्धी दोन जुळ्या मुली झाल्या होत्या. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2019 रोजी सात महिन्याच्या सिद्धीला आरोपींनी जाणीवपूर्वक बाहेरील दूध पाजले. दूध पाजल्यानंतर ती अत्यवस्थ झाली आणि रुग्णालयात तिचा दुर्देवी मृत्यू झाला.त्यानंतर पुन्हा 6 फेब्रुवारी 2020 रोजी रिद्धीला झोपेत असताना बाहेरील दूध पाजले गेले. त्यात रिद्धीचा मृत्यू झाला. रिद्धी आणि सिद्धी यांचा मृत्यू बाहेरील दूध पाजून झाला. त्यामुळे दूधात काहीतरी मिसळल्याचा संशय उर्मिलाचा तक्रारदार भाऊ लोभे यांना होता. त्यानंतर लोभे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाने याप्रकरणी खून, कट रचणे या कलमांन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिसांना दिले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस शिवले याबाबत पुढील तपास करत आहेत.

COMMENTS