Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू

गडचिरोली- लग्न कार्यक्रम आटोपून गावाकडे परत जात असताना झाडाखाली थांबलेल्या पती-पत्नी आणि दोन मुलांवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडचिर

राष्ट्रसण आणि कायदा
विकासकामांच्या स्थगितीवरून संघर्ष पेटला
सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार : 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार

गडचिरोली- लग्न कार्यक्रम आटोपून गावाकडे परत जात असताना झाडाखाली थांबलेल्या पती-पत्नी आणि दोन मुलांवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. भारत राजगडे (35 वर्ष), अंकिता भारत राजगडे (28 वर्ष), बाली भारत राजगडे (2 वर्ष), देवाशी भारत राजगडे (4 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. भारत राजगडे हे आपल्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन लग्न कार्यक्रमासाठी गेले होते.

लग्नावरुन सायंकाळी गावाकडे परत जात असताना अचानक मेघगर्जना आणि वादळ सुरू झाले. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी वीज कोसळल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने आमगाव बुटी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली

COMMENTS