Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा : खा. श्रीनिवास पाटील

कराड / प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय कायदा व न्य

सिल्व्हर ओकवरील हल्ला पूर्व नियोजित कट : ना. जयंत पाटील
त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रातील घटना लाजिरवाणी : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री
सत्तेत असताना पेठ-सांगली रस्त्याचा दुसर्‍याला दोष का? : आ. जयंत पाटील

कराड / प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली आहे. कोल्हापूरला सर्किट बेंचसाठी अनेक वर्षापासून मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खा. पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रिजिजू यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी आग्रही मागणी केली.
खा. पाटील म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करावे, अशी मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने सर्किट बेंचच्या स्थापनेबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. सर्किट बेंच स्थापनेनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
त्या जिल्ह्यातील नागरिकांना उच्च न्यायालयाशी संबंधित कामासाठी मुंबईला जावे लागते. त्याकरिता सुमारे 300 ते 450 किलोमीटर लांबून प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा अनावश्यक खर्च होत असतो. कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झाल्यास शेजारील जिल्ह्यातील दोन कोटींहून अधिक लोकांना याचा फायदा होईल. त्यामुळे सर्किट बेंच स्थापन होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करावेत.

COMMENTS